नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. जर आपल्या जीवनात दुःख आणि परेशानी चालू असेल , आपल्या जीवनात जर वाईट काळ चालू असेल तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
आता आपल्या सुख समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. चतुर्थीचे व्रत करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. मित्रानो कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील या पैकी कोणतेही चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होत असते.
महाराष्ट्र किंवा तामिळनाडू मध्ये हे दोन्ही व्रत करण्याची परंपरा आहे. भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी दिवसभर व्रत उपवास करून रात्री चंद्र दर्शन घेऊन श्री गणेशाची विधिविधान पूर्वक पूजा केली जाते.
मित्रानो भगवान श्री गणेश सुख कर्ता असून दुःख हर्ता आहेत. त्यामुळे आपल्या जीवनात कोणतेही दुःख , कोणतेही संकट असुद्या गजाननाची कृपा बरसल्या नंतर प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही.
मित्रानो वैशाख कृष्ण पक्ष मृग नक्षत्र दिनांक ४ मे रोज बुधवार असून वरदविनायक चतुर्थी आहे. मित्रानो या वेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. बुधवारी येणारी चतुर्थी अतिशय महत्वपूर्ण मानली जाते.
पंचांगानुसार हा दिवस अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील निराशा समाप्त होणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या मनात निर्माण झालेली नकारात्मक भावना आता दूर होणार आहे. आता जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनात होईल.
आपली निराशा आता दूर होणार असून आशेची नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ दिसून येईल. अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.
मित्रानो मागील काळात ज्या चुका आपण केल्या होत्या त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. चुकांची पुनरावृत्ती करणे टाळून चुका सुधारणे आवश्यक आहे. आपण फार हुशार आहात.
आपण समाधानी वृत्तीचे देखील आहात पण आपल्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द सुद्धा आहे. एकदा जर तुम्ही काही ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्यामुळे या काळात चांगली मेहनत घेतली तर यश हमखास प्राप्त होणार आहे.
गजाननाची कृपा आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि ग्रहनक्षत्राचा शुभ संयोग असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला नशीब भरपूर साथ देणार आहे. जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.
आता काळ विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. करियर मध्ये आर्थिक प्राप्तीच्या संधी देखील चालून आपल्याकडे येतील.
मित्रानो आलेली प्रत्येक संधी हि मौल्यवान आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही कामाची पूजा करताना मनोमन श्री गणरायांचे स्मरण करून कोणत्याही कामाची सुरवात केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ , मिथुन , कर्क , कन्या , धनु आणि मकर रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.