सिंह राशीच्या जीवनातील कटू सत्य. का मिळते दुःख ? या 3 राशींपासून दूर रहा. स्वभाव , करियर

0
96

नमस्कार मित्रांनो

मित्रानो सिंह राशीच्या आयुष्यात दु:ख का असतात यामागचे कारण काय ? तुमचे जीवन कसे बदलू शकते आणि कोणत्या राशीच्या व्यक्तिपासून तुम्हाला दूर राहावे लागेल किंवा अशी कोणती राशी आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नये अन्यथा ते तुमचा विश्वासघात करू शकतात किंवा भविष्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात.

सिंह राशीचे लोक कसे असतात, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे गुण, त्याचे चारित्र्य याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सिंह रास ही राशीचक्रातील पाचव्या क्रमांकाची राशी आहे. ग्रहांचा राजा सूर्यदेव सिंह राशीचा अधिपती आहे.

मित्रानो सिंह रास ही अग्नी तत्वाची रास आहे. सिंह राशीचे सर्व लोक स्वतःला राजा मानत असतात. त्यांच्यामध्ये अहंकार असतो, बारा राशींपैकी सिंह राशीमध्ये अहंकार सर्वाधिक असतो. हे लोक मनाने खूपच चांगले असतात, पण हा चांगुलपणा प्रत्येकाला दिसत नाही.

हे लोक खूप दयाळू असतात. जर कोणी नाराज , दुखी दिसले तर त्यांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल दया येते. पण दुसरीकडे त्यांना कुणी चिडवलं, कुणी त्रास दिला, तर त्यांना कधी राग येतो ते कळतही नाही, या राशीच्या लोकांना प्रचंड राग येतो.

सिंह राशीच्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीशी वायफळ बोलणे आवडत नाही. हे लोक मनात जे काही असते ते सरळ तोंडावर बोलून टाकतात. त्यासोबतच सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप चांगला असतो आणि सिंह राशीला प्रवास करणे, हिल स्टेशनवर जाणे, क्रीडा क्षेत्र खूप आवडते.

सिंह राशीच्या व्यक्तीला अधिक कामुक राहणे आवडते. सिंह राशीचे लोक हे राजा असल्यामुळे त्याना कोणाच्या प्रेशर खाली काम करणे आवडत नाही, जर ते काम करत असतील तर त्यांना त्याच्या इच्छेनुसार काम करायला आवडते.

हे लोक कोणी सांगितले म्हणून कोणतेही काम करत नाहीत मग ते घरातील असो, ऑफिसमध्ये असो. ते काम स्वत:च्या इच्छेने करतील. सिंह राशीचे लोक पाहिजे तितके कष्ट करू शकतात, परंतु त्यांचे मन लागेल तेथे आणि त्यांच्या मनात आले तरच. हे लोक कोणाचेही ऐकत नाहीत. ऐकावे जनाचे करावे मनाचे असे काहीसे असतात हे लोक.

या सोबतच सिंह राशीच्या लोकांना वाटते की नेहमी मोठ्या पदावर राहून काम करावे, छोट्या नोकऱ्यांमध्ये राहून लहान-मोठे काम करणे किंवा कोणाच्याही दबावाखाली काम करणे त्यांना आवडत नाही. हे लोक न्याय प्रिय असतात, ते चुकीचे करत नाहीत, ते कोणाशीही अन्याय करत नाहीत. हे लोक जे काही करतात ते स्वतसाठी आणि लोकांच्या भल्यासाठी करतात.

यांचे मित्र बघितले तर ते फार नसतात, पण जे असतात ते सुशिक्षित आणि खूप चांगल्या पोस्टवर असतात. हे लोक रोमँटिक असतात. त्यांना त्यांच्या पद्धतीने सर्वकाही करायला आवडते.

कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचे नाते बनवू नये आणि जास्त विश्वास ठेऊ नये आणि कोणत्या लोकांपासून काळजी घ्यावी आणि नेहमी यांच्यापासून थोडेसे दूर रहावे. या तीन राशी म्हणजे वृषभ, तूळ आणि मकर.

या तीन राशी अशा आहेत ज्यांच्यासोबत जर सिंह राशीक्या व्यक्तीने संबंध ठेवले आणि विश्वास ठेवला,तर त्यांनी कितीही काहीही केले तरी शेवटी तुमचे नुकसानच होईल, कारण सिंह राशीच्या लोकांचे त्यांच्याशी फार काळ संबंध टिकून राहत नाहीत.

वृषभ, तूळ आणि मकर राशीशी सिंह राशीचे ताळमेळ आणि विचार जुळत नाहीत. शेवटी तुमच्या आयुष्यात दु:ख का येते…तुम्हाला दुःखी का व्हावे लागते? याचे कारण काय आहे आणि तुम्ही तुमचे जीवन कसे बदलू शकता?

मित्रांनो पहिले कारण म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये राग सर्वात जास्त असतो, ज्यामुळे कुटुंबात, वैवाहिक जीवनात, प्रेमात, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला लवकर राग येतो ज्यामुळे तुमचे नाते बिघडते आणि ते नाते तुटू शकते.

तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागते किंवा कुटुंबात कोणताही आधार नसतो, हे सगळ तुमच्या रागामुळे घडत लक्षात ठेवा. यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप होईल आणि फक्त तुम्हालाच दुःख मिळेल. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि बदल करा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून जीवन जगलात तर आयुष्य खूप सुंदर होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here