नमस्कार मित्रांनो
मित्रानो तुम्हाला हे माहित आहे का की कुंकू मध्ये ही एक वस्तू ठेवल्याने तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी शुभ असते. तुम्हाला या गोष्टीबद्दल नक्कीच माहिती नसेल. माहित नसेल तर हा लेख नक्की वाचा.
हिंदू धर्मात सुहासिनी स्त्रियांच्या आयुष्यात कुंकवाचे खूपच जास्त महत्त्व आहे. हिंदू धर्मात प्रत्येक स्त्रीने सिंदूर लावलेले तुम्ही पाहिले असेल. हिंदू धर्मात कुंकवाला सुहासिनी स्त्रियांचे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
कोणतेही लग्न कुंकवाशिवाय पूर्ण होत नाही आणि एकदा लग्न झाले की प्रत्येक स्त्री ने कुंकू लावणे अनिवार्य असते. पण बदलत्या जीवन शैलीमुळे आजकाल मुली लग्न झाले तरी कुंकू लावत नाहीत.
यामागचे कारण म्हणजे आजकालच्या मुलींना कुंकुचे महत्वच माहित नाही. पण तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की हिंदू धर्मात बनवलेल्या या परंपराचे फक्त धार्मिक महत्व नाही. तर या बाबतीत काही वैज्ञानिक महत्व ही सांगितले आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार सिन्दुर लावण्याचे ही काही नियम असतात आणि त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. सिन्दुर लावण्याच्या संदर्भात काही नियम सांगितले आहेत त्याचा विधिपूर्वक पालन केले पाहिजे नाहीतर आयुष्यात समस्या येऊ शकतात.
जी महिला सिन्दुर लावण्याच्या नियमांचे पालन करत नाही अशा स्त्रीच्या पतीला धन तसेच आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया सिन्दुर लावण्याचे कोणते नियम आहेत ज्याचे पालन प्रत्येक स्त्रीने केलेच पाहिजे.
लग्न झालेल्या स्त्रीने स्वतःच्या पैशाने सिन्दुर खरेदी करून लावले पाहिजे. दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेले सिन्दुर लावणे चांगले नसते. तसेच दुसऱ्याने दिलेले सिन्दुर लावल्याने अनर्थ होतो. तसेच धन वैभव कमी होऊ शकते. पतीला सफलता मिळत नाही. घरात क्लेश भांडण होत राहते.
काहीही झाले तरी लग्न झालेल्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे सिन्दुर लावण्यापासून वाचले पाहिजे. दुसऱ्या स्त्रीचे सिन्दुर घेऊन भांगेत लावणे खूपच अशुभ समजले जाते. अस करणाऱ्या स्त्रीच्या पतीला धन संबंधित समस्या होऊ शकतात.
लग्न झालेल्या स्त्रीने गिफ्ट मिळालेले सिन्दुर नाही वापरले पाहिजे. कारण धार्मिक ग्रंथात गिफ्ट मिळालेले सिन्दुर वापरणे अशुभ मानले आहे. फक्त आपल्या पतीने दिलेले सिन्दुर वापरले पाहिजे. लग्न झालेल्या स्त्रियांसाठी हे शुभ मानले गेले आहे.
अंघोळ न करता कोणत्याही स्त्रीने सिन्दुर लावू नये. सर्वात आधी महिलेने अंघोळ करावी व त्यानंतर पूजा करूनच मग सिन्दुर लावावे. सिंदुर लावत असताना नेहमी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळावे अशी इच्छा व्यक्त करावी. यामुळे त्यांचे भाग्य अजून प्रबळ होते.
घरात जर सुतक असेल किंवा तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही सिन्दुर लावू नका अस केल्याने सिन्दुरचा अपमान होतो. त्याचबरोबर माता लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही.
कुंकू पडणे खूपच अशुभ मानले जाते. त्यामुळे हे नेहमी लहान मुलांपासून लांब ठेवा. दुसऱ्या समोर कधीही सिन्दुर लावू नका, तुम्ही दुसऱ्या समोर सिन्दुर लावत असाल तर तुमच्या नवऱ्याला नजर लागू शकते आणि तुमचे प्रेम कमी होऊ शकते.
राईच्या तेलात थोडेसे कुंकू मिक्स करून त्या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दाराला ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह काढावे. यामुळे पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते आणि दाम्पत्य जीवन मधुर बनते. भांगात कुंकू भरताना ते नेहमी अनामिका बोटानेच भरावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.