नमस्कार मित्रांनो
मित्रानो शास्त्रात सांगितले आहे की स्त्री असो किंवा पुरुष रात्रीचे हे काम कधीच करू नका. शास्त्रामध्ये ऋषी यांनी विविध कार्य करण्यासाठी वेळ ठरवली आहे. रात्री भोजन, शयन यांच्या संबंधित अनेक उपयोगी गोष्टी अनुभवावर आधारित सांगितल्या आहेत.
संध्याकाळची वेळ ही पूजा करण्यासाठी असते. पण हे निश्चित केले आहे कारण मनुष्य विकारांपासून दूर रहावा आणि त्याच्या मनात सकारात्मकतेचा प्रवाह अधिक व्हावा.
कारण रात्रीच्या अंधारात नकारात्मकतेचा प्रभाव अधिक असतो. त्याचप्रकारे ऋषिनी रात्री काही कार्य करण्यास निषेध केला आहे. खास करून महिलांना या कार्यापासून लांब राहण्यास सांगितले आहे, या कार्याचा परिणाम शुभ असत नाही. जाणून घेऊया हे कार्य कोणते आहेत.
सोळा शृंगारांपैकी एक म्हणजे सुगंधित द्रव्य लावणे. काही लोकांना रात्री सुगंधित पदार्थ अत्तर वगैरे लावण्याची आवड असते. शास्त्रात सांगितले आहे की रात्री सुगंधित अत्तर वगैरे लावू नये. यामुळे मनुष्यावर नकारात्मक प्रभाव होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
केस हे सौन्दर्य वाढवतात पण शास्त्रामध्ये रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडणे निषेध केला आहे. अस म्हणले जाते की याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि मोकळे केस नकारात्मक शक्तीला आकर्षित करतात. आणि हे भाग्योदय मध्ये बाधक ही असतात.
रात्री स्मशान भूमीत कधीच जाऊ नये, समशानात ही नकारात्मक ऊर्जा अधिक असते. तिथे मृत शरीर जळल्याने विविध नकारात्मक शक्ती निर्माण होतात आणि अशी ऊर्जा हानिकारक असते. म्हणून रात्री स्मशान सारख्या जागी कधी जाऊ नये.
अस म्हणतात की संध्याकाळ झाल्यानंतर माणसांनी घरीच राहिले पाहिजे. जर काही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर परिवारातील व्यक्तीला सोबत घेऊन गेले पाहिजे.
शास्त्रामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनीही एकांतात कोणालाही भेटण्यास जाऊ नये. खास करून कोणी अनोळखी किंवा वाईट चरित्र्य असणाऱ्या व्यक्तीला कधीच भेटू नये. याचे वाईट परिणाम होतात व काही अनिष्ठ घटना घडू शकते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.