पत्नीच्या या चुकांमुळे पत्नीच्या अगोदर पतीचा मृत्यू होतो ?

0
4302

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही व्यक्तीचे जीवन जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही तोपर्यंत अपूर्ण मानले जाते. विवाहानंतर ज्यावेळी एकमेकांना जोडीदार मिळतात त्यावेळी खरोखर त्यांचे जीवन पूर्ण होते. पती पत्नी हे एकमेकांसाठी खूप कष्ट घेतात. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.

कोणतीही गोष्ट जी आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही ती आपण आपल्या जोडीदारबरोबर शेअर करू शकतो. दोन झाडे जशी शेजारी शेजारी लावलेली असली की त्यांच्या मुळ्या एकमेकांमध्ये गुंतून जातात त्याप्रमाणे पती-पत्नीचे जीवन एकमेकांशी संलग्न होते.

परंतु कधी कधी असे होते की, या वैवाहिक जीवनात काही तरी विपरीत घडते आणि तरुणपणातच पतीचा मृत्यू होतो. मग पत्नीला काय करावे ते समजत नाही. परंतु इतकी मोठी घटना घडण्यापूर्वी त्यामागे नेमके काय कारण आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

तरुणपणातच पतीचा मृत्यू होणे यात पत्नीच्या काही चुका जबाबदार असतात. ठीक आहे प्रत्येकाचे कर्मभोग असतात त्यांचे जीवनच तेवढे असते असे आपण म्हणतो. परंतु थोडीफार काळजी घेतली तर या आकस्मित घटनांपासून आपण आपल्या पतीचे संरक्षण करू शकतो.

चला तर जाणून घेऊयात कळत नकळतपणे पत्नीकडून अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे पतीचे आयुष्य कमी होते ते. स्त्रिया पतीचे आयुष्य वाढावे त्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी विविध प्रकारची व्रतवैकल्ये उपवास आणि पूजन करतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक व्रतवैकल्ये ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी असतात.

वटपौर्णिमा, करवा चतुर्थी , हरितालिका व्रत हे सर्व व्रत पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते. काही स्त्रिया व्रत निराहार राहून करतात तर काही स्त्रिया हे व्रत फलाहार करुन करतात. फक्त श्रद्धा व भक्ती असेल तर कशाही प्रकारे व्रत केले तरीही त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते.

परंतु काही स्त्रिया इतरांना दाखवण्यासाठी व्रत करतात आणि गुपचुपने जेवण करतात आणि व्रताचा भंग करतात. तुम्हाला जर निराहार व्रत करणे शक्य नसेल तर दूध फळे घेऊन व्रत करा किंवा व्रत करायचे नसेल तर करू नका.

परंतु व्रत करून जर असा मध्येच व्रताचा भंग केला तर त्याचा खूप वाईट प्रभाव आपल्या जीवनावर व परिणामी पतीच्या आयुष्यावर होतो आणि पतीचा मृत्यू लवकर होतो. काही स्त्रियांना खोटे बोलण्याची खूप वाईट सवय असते.

त्या प्रत्येक छोट्या छोट्या बाबींमध्ये खोटे बोलतात आणि आपले खोटे खरे आहे हे दाखविण्यासाठी आपल्या पतीच्या खोट्या शपथा घेतात. पतीला उलट सुलट बोलतात. पतीचा आदर करीत नाहीत आणि इतरांसमोर पतीला बरे वाईट बोलून त्यांचा अपमान करतात.

ज्या स्त्रिया पतीला अशी वागणूक देतात व छोट्या छोट्या गोष्टींवर पतीची खोटी शपथ घेतात त्या स्त्रियांच्या पतीचेही आयुष्य कमी कमी होत राहते. आणि तरुणपणातच अशा स्त्रियांना वैधव्याचा सामना करावा लागतो.

आज काल विवाह झालेल्या मुलीही फॅशनच्या नावाखाली अगदी कुमारिकांप्रमाणेच राहतात. लग्नानंतरही त्या गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत. कपाळावर टिकली लावत नाहीत. हातात बांगड्या भरत नाही आणि पायात जोडवे घालत नाही. या सर्व वस्तू त्यांना आऊटडेटेड वाटतात.

परंतु या सर्व वस्तू सौभाग्याचे प्रतीक आहेत. ठीक आहे तुम्ही जास्त फॅशनेबल आहात. तुम्ही खूप मोठे जाड असे मंगळसूत्र नका घालू त्याऐवजी गळ्यात फॅन्सी पोत घाला. कपाळावर कुंकू न लावता छोटी टिकली लावा. हातात एक एक बांगडी घाला. नाजूकसे जोडवे घाला. या वस्तूंमुळे ही आपले सौंदर्य खुलून दिसते.

सर्वकाही काढून फेकले म्हणून आपण फॅशनेबल वाटत नाही. या वस्तूंमुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते. काही स्त्रिया म्हणतात की फॉरेनमधील स्त्रिया कोठे या सर्व वस्तू वापरतात. मग त्यांचे पती काय तरुणपणातच त्यांची साथ सोडून जातात का? आपण पाश्चात्यांचे अनुकरण करून आपल्या संस्कृतीला विसरत चालो आहोत.

फॉरेनमध्ये लग्न टिकतातच कुठे, ते असे लग्न करतात आणि थोड्याच काळात लगेच घटस्फोट होतात. मग दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित करतात. तेथे पती पत्नी, विवाह बंधन अशा गोष्टींना काही अर्थ नाही. परंतु आपल्याकडे विवाह म्हणजे एक पवित्र सोहळा असतो.

यामध्ये अग्नीच्या व देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पती पत्नी एकरूप होत असतात. आपल्या ऋषी मुनींनी इतके ग्रंथ पुराणे लिहिली आहेत ती काही अशीच नाही. आपल्या प्रत्येक ग्रंथात काहीतरी तथ्य आहे. आपण ते मानलेच पाहिजे. तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे.

हा जड ग्रह आहे म्हणून या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस धुऊ नये. कारण यामुळे गुरु हलका होतो व पती तसेच मुलांचेही आयुष्य कमी कमी होत जाते. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की, पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू का होतो ते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here