नमस्कार मित्रानो
मित्रानो या वर्षी नवरात्री ७ ऑक्टोबर गुरुवार पासून सुरू होणार आहे , म्हणजेच 7 ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना आहे. यादिवशी घटाची स्थापना केली जाईल. परंतु मित्रानो नवरात्री येण्याआधी म्हणजे ७ तारखेच्या आधी किंवा ७ तारखेला देखील तुम्ही ही वस्तू आणू शकता.
सध्या बरेच लोक विचार करतात की पितृपक्ष सुरू आहे म्हणून आम्ही नवीन काही खरेदी करणार नाही , नवीन कोणती वस्तू आणणार नाही. मित्रानो जर पितृपक्षात तुम्हाला नवीन वस्तू आणायची नसेल तर तुम्ही सात तारखेला दिवसा ही वस्तू आणू शकता.
परंतु ७ तारखेलाच आणा कारण मग नवरात्र तर त्याच दिवसापासून सुरू होणार आहे म्हणून तुम्ही नवरात्रीच्या आधी आणायचे असेल तर आधी आणा किंवा ७ तारखेला पहिल्या दिवशी आणायचे असेल तर पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही ही वस्तू आणू शकता. आता ही वस्तू कोणती आहे ?
मित्रानो तुम्हाला नवरात्री येण्याआधी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतेची मूर्ती आणायची आहे ,आणि जर तुमच्या घरात कुलदेवतेची मूर्ती आधीपासूनच असेल तर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी त्या कुलदेवतेच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करायचा आहे.
दुधाने , पाण्याने त्यांचे पूजन करायचे आहे आणि ९ दिवसापर्यंत त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवायचे आहेत. त्यांची पूजा करायची , त्यांचा मंत्र जप करायचा , त्यांची आरती करायची असं ९ दिवसापर्यंत तुमच्या कुलदेवीची किंवा कुलदेवतेची तुम्ही आराधना सेवा करावी.
मित्रानो आता प्रश्न पडतो की आमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नाही तर मग कुलदेवीची मूर्ती नसेल तर कुलदेवी तुम्हाला माहित असेल की आमची कुलदेवी ही आहे. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्री येण्याआधी तुम्ही ती मूर्ती घरात घेऊन यायची आणि आपल्या देवघरात तिची स्थापना करायची आहे.
काहींना हा प्रश्न पडतो की आमची कुलदेवी कोण आहे हेच माहीत नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही कुलदेवीच्या नावाने एक कळस देवघरात स्थापन करावा ९ दिवसासाठी. पहिल्या दिवशी तुम्ही स्थापन करावा म्हणजे तांब्या घ्यायचा त्यामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची. शुद्ध पाणी भरायचा आणि त्यावर नारळ ठेवायचा.
त्यानंतर त्याचे पूजन करायचे मग तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या. फक्त कुलदेवीचे स्मरण करायचे. नाव माहीत नसेल , कुलदेवी माहीत नसेल तरी तुम्ही स्मरण करायचे. देवीला नमस्कार करायचा आणि त्या कळसाचे कुलदेवी समजून तुम्ही ९ दिवस पूजन करायचे आणि ९ दिवस झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तो नारळ फोडून खायचा नाहीये.
त्या नारळातील पाणी , साल सर्व काही विसर्जन करायच आहे. कळसातील पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता आणि विड्याचे , आंब्याचे पान आणि नारळ असेल ते वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करू शकता. तर अशा रीतीने तुम्ही नवरात्री येण्याआधीच किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक तर कुलदेवीची मूर्ती आणा किंवा कळस स्थापन करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.