मिथुन राशीच्या लोकांचे सगळ्यात मोठे शत्रू असतात हे लोक..आजच जाणून घ्या , जे व्हायचं ते होऊ दे

0
464

नमस्कार मित्रांनो

मित्रानो माणूस जन्माला येतो त्या वेळेस काही नाती रक्ताची असतात. त्यानंतर आपण जसजसे मोठे होत जातो काही नात्यांना आपण मित्र असे म्हणतो. जसा जसा वेळ जातो आपल्याला कळते कि काही लोक अकारण आपले वाईट चिंततात, आपलं चांगलं होऊ नये असे त्यांना सतत वाटत राहते किंवा चांगले झाल्यास त्यांना बघवत नाही.

अशा लोकांना आपण शत्रु किंवा हिट शत्रू म्हणतो. काही उघड शत्रू असतात तर काही मित्राचे सोंग घेऊन मैत्री आड आपले शत्रू बनून राहतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मिथुन राशीच्या अशाच काही शत्रूंबद्दल.

ज्योतिष शास्त्र प्रमाणे काही अंदाज वर्तवले जातात आणि बर्‍याच अंशी ते अंदाज खरे देखील ठरतात. अनेकदा माणसे ओळखण्यात आपली फसगत होते आणि वेळ निघून गेल्यावर आपल्या लक्षात येते. तेव्हा मिथुन राशी वाल्यानो आत्ताच ही माहिती जाणून घ्या.

मिथुन राशीच्या जातकांची सफलता लक्षात घेऊन ही माहिती आम्ही देत आहोत. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव मुळता हा खूप खुल्या मनाचा असतो. यामुळे त्यांना असे वाटते की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती जणू मित्रच आहे.

या राशीचे लोक आपल्या मित्रांना त्यांच्या सुख दुःखात साथ देतात. आयुष्यातील कुठल्याही छोट्या मोठ्या घडामोडी असो ,नोकरी, ब्रेकप या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी मित्रच तर लागतो.

आयुष्य जस पुढे पुढे जात राहत तसे जुने मित्र काळाच्या ओघात कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही आणि नवीन मित्र बनत जातात. मिथुन राशीचे लोक नेहमी मैत्री मध्ये धोका खातात असे आपल्याला दिसते.

मग प्रश्न असा येतो की खरंच जवळ असणारे व्यक्ती मित्र आहे की मित्राच्या रूपात दुश्मन? कारण आज-काल ओठात एक आणि पोटात एक असं असत. यामुळे माणसं समजणे अवघड जाते. ‘Frenemy’ म्हणजे फ्रेंड आणि एनिमी.

अशी व्यक्ती जी मित्र असण्याच नाटक करते परंतु तुमच्याप्रती त्याचे विचार दुश्मना प्रमाणेच असतात. असे ईर्षा करणारे लोकं कशी ओळखावी? खरंतर बारकाईने निरीक्षण केल्यास माणसं ओळखणे फार अवघड नाही.

पहिले लक्षण तुमच्याशी खूप गोड बोलून चांगला व्यवहार आहे असं दाखवून तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात. असे लोक तुमच्या मैत्रीच्या लायक नाहीत असे ओळखावे. ते म्हणतात ना खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तसंच काहीसं.

असे लोक कायम तुमची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्न करत असतात. जर कोणी तुमची अकारण प्रशंसा करत असेल तर त्याला तेथेच थांबवा. तोंडावर अति स्तुती करणारे लोक देखील तितकेच घातक असतात.

एक खरा मित्र तोच असतो जो तुमच्या यशामध्ये आनंदी होतो. तुमच्याबद्दल समोर किंवा पाठीमागे कधी ही नकारात्मक बोलत नाही. तुम्ही चुकलात तर तुम्हाला योग्य ती चूक वेळेत दाखवून सुधारणा करण्याचा सल्ला देतो. तुमच्या दुःखामध्ये तो तुमची साथ कधीच सोडत नाही.

नकारात्मक व्यक्तीला तुमच्या अवतीभवती भटकू देऊ नका. तुम्हाला एखादी जवळची व्यक्ती मित्र बनवून खोटं बोलत आहे असे जाणवल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखून त्यापासून चार हात दूरच राहा. अशा व्यक्तींवर पुन्हा भरवसा ठेवण्याची चूक करू नका.

कारण ते नेहमीच खोटं बोलून तुमचा विश्वास घात करतच राहतील. असे लोक अप्रत्यक्षपणे तुम्हाला नेहमी नुकसान पोहोचवण्याच्या विचारात असतात. मिथुन राशीच्या जातकांना अवतीभवती अशाप्रकारचे मित्र अनेक आहेत. अशांना मित्र नव्हे तर शत्रूच म्हणायला पाहिजे.

तेव्हा अशा लोकांना वेळीच ओळखा आणि सावधान राहून त्यांच्यापासून अंतर ठेवा. चाणक्य सांगतात की नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकांनाच मित्र बनवले पाहिजे. तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा हेतू असणारे लोक तुमचे मित्र कधीच बनू शकत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here