नमस्कार मित्रांनो
मित्रानो काही लोकांच्या जीवनात कर्जाविषयी इतक्या समस्या असतात की त्यांचा पगार तर चांगला असतो पण ते स्वतःसाठी काहीही घेऊ शकत नाहीत किंवा स्वतःसाठी पैसे ठेऊ शकत नाहीत. जेवढे पण ते पैसे मिळतात ते सर्व कर्जातच निघून जातात. पूर्ण जीवन फक्त कर्जच भरण्यात जाते.
24 तास कर्जाची समस्या त्यांना एवढी जाणवत असते की मन शांत होतच नाही. अस म्हणलं जात की ज्या व्यक्तीच्या जीवनात कर्जाची समस्या असते, त्याला रात्री सुद्धा चांगली झोप येत नाही.
आज आम्ही तुम्हाला वडाच्या झाडाचा असा एक उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे कर्जाच्या सर्व समस्या दूर होतील. पण हा उपाय तुम्हाला तेव्हाच करायचा आहे जेव्हा तुम्हाला आर्थिक समस्या खूप अधिक असेल आणि तुमचे कर्ज काही केल्या फिटत नसेल. पण हा उपाय करायचा कसा याबद्दल आता आपण माहिती घेऊया.
वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणले जाते. काही लोक असेही म्हणतात की वडाच्या झाडाजवळ कधीच जाऊ नये कारण या झाडाजवळ खूप अदृश्य शक्ती वास करत असतात.
भूत – प्रेत, काळ्या शक्ती हे सगळे वास करतात. अस तुम्ही ऐकलं असेल कारण वडाचे झाड हे खूपच खास आणि चमत्कारिक वृक्ष आहे. या झाडाचा कोणी फायदा घेऊ नये म्हणून अशा अफवा पसरवल्या जातात.
वडाचे झाड हे खूपच सात्विक वृक्ष आहे. वडाच्या झाडामध्ये भगवान शिव यांचा वास असतो. याच्या मुळापासून ते पाने, फळे, फांद्या हे सर्वच खूप शक्तीशाली असतात. जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संकट येतात तेव्हा त्याच्या सात चक्रापैकी एका चक्रात काही ना काही गडबड झालेली असते.
जस की कर्जाच्या समस्या होतात किंवा आर्थिक समस्या होतात. ज्या व्यक्तींवर तंत्र मंत्र, जादूटोणा अशा शक्तींचा प्रभाव लवकर होतो त्या व्यक्तीचे मूलाधार चक्र हे खूप कमजोर असते, असे लोक स्वतःला बघून ही घाबरतात. त्यांचे मूलाधार चक्र कमजोर असल्यामुळे सर्वजण त्यांना नजर लावत असतात.
त्यामुळे ते नेहमी चिंतेत असतात. पण हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता. एक तर वडाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसा असे केल्याने खूप शांती मिळेल. ज्यांना झाडावर चढणे येत नसेल त्यांनी आपली कंबर झाडाला टेकवून तिथे थोडा वेळ बसा यामुळे तुमच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
वडाच्या झाडाखाली बसायला आजपासूनच सुरुवात करा काही दिवसांतच तुम्हाला जाणवेल कि वडाचे झाड तुमचे संकट, समस्या स्वतःमध्ये शोषून घेईल कारण हे एक असे वृक्ष आहे त्याचा विस्तार कधीच थांबत नाही. आणि त्याचा विस्तार असा असतो की त्याची मूळे आत मध्येच खूप लांब पर्यंत गेलेली असतात.
आर्थिक समस्येतून सुटका हवी असेल व कर्जातून मुक्ती हवी असेल तर हा उपाय नक्की करा. पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन वर असणाऱ्या मुळांना एक गाठ बांधायची आहे.
वडाच्या झाडाला नमस्कार करून आपली समस्या सांगायची आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे. हा खास उपाय तेव्हाच करा जेव्हा आपल्या जीवनात धनाची समस्या खुपच असेल.
जेव्हा तुम्ही वडाच्या पारंब्याना गाठ मारता यामुळे आकस्मिक धन लाभ होतो. जे धन तुम्हाला भविष्यात मिळणार होते तेच तुम्हाला वर्तमानात मिळायला सुरुवात होईल. आर्थिक समस्या असल्यावर वडाच्या झाडाचे मूळ आपल्याला घरी घेऊन जायचं आहे.
त्यानंतर त्याला चंदनाचा लेप करून लाल वस्त्रात बांधून आपल्या पैशाच्या तिजोरीत किंवा व्यापार करता अशा ठिकाणी ठेवायचे आहे. जिथे तुम्ही मूळ ठेवता तिथे विस्तार कधीच थांबत नाही व आर्थिक समस्या दूर होते. वडाच्या मुळात अपार ऊर्जा असते हे जिथे पण ठेवाल तेथील विस्तार खूप जलद गतीने होतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.