नमस्कार मित्रांनो
मित्रानो विष्णू पुराणानुसार कोणत्याही बुद्धिमान पुरुषाने या चार स्त्रियांशी कधीही लग्न करू नये नाहीतर त्याला दुःख, दारिद्र्य आणि विनाशाचा सामना करावा लागू शकतो.
विष्णू पुराणानुसार ज्या पुरुषांची पत्नी पतिव्रता असते तो दीर्घायू तसेच सर्व सुख प्राप्त करणारा असतो. पण जर त्याने या चार प्रकारच्या स्त्रियांशी लग्न केले तर तो स्वतः चे वाईटच करून घेतो. अशी स्त्री त्याच्या आयुष्यात दुःखच घेऊन येते.
त्याचबरोबर स्त्रियांना ही या पाच प्रकारच्या पुरुषांशी लग्न करण्यास मनाई केली गेली आहे. जर स्त्री या पाच प्रकारच्या पुरुषांशी लग्न करत असेल तर तिला जीवनभर दुःख आणि कष्ट भोगावे लागतात. तिला जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात.
विष्णू पुराणानुसार विवाह हे एक पवित्र बंधन आहे जे दोन पवित्र आत्म्याचे जन्मोजन्मीचे पवित्र बंधन असते. एकदा विवाहाच्या बंधनात बांधले गेल्यानंतर त्यांचे नशीब सुद्धा एकमेकांशी जोडले जाते.
स्त्री पुरुष एकमेकांचे सुख दुःख, तसेच पाप पुण्य याचे भागीदार होतात. जे पाप पुरुष करतो त्याचा प्रभाव पत्नीवर आणि जे पाप पत्नी करते त्याचा प्रभाव पतीवर पडतो. पती पत्नीने वाईट वेळेत एकमेकांची साथ सोडली नाही पाहिजे.
पुरुषाने एकाच पत्नी सोबत एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि पत्नीने सुद्धा एकाच पतीसोबत एकनिष्ठ राहिले पाहिजे तेव्हाच त्यांना सौभाग्य प्राप्त होते. लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्यानंतर सुद्धा जे लोक आपल्या पार्टनर ला धोका देतात त्यांना नरकात जावे लागते.
चला तर मग जाणून घेऊया विष्णू पुराणानुसार कोणत्या स्त्री किंवा पुरुषाशी लग्न करू नये याबद्दल सांगितले आहे. विष्णू पुराणानुसार अत्यंत क्रोधी, पैशांना लालची, दंड देणारे आणि रोगी पुरुषाशी लग्न करू नये.
असे झाल्यास स्त्रीला जीवनभर कष्टाचा सामना करावा लागतो. कारण क्रोधी पुरुष जीवनभर तिचा अपमान करेल, नशा करणारा नशेत संपूर्ण धन बरबाद करेल, दंड देणारा तिच्यासोबत हिंसा करेल आणि रोगी पुरुष लवकरच मृत्यूला प्राप्त होईल. म्हणून या पाच प्रकारच्या पुरुषाशी कधीच लग्न करू नका.
विष्णू पुराणानुसार जी स्त्री कोणत्या अन्य पुरुषावर प्रेम करत असेल किंवा तिच्या मनात दुसरेच कोणी आहे अशा स्त्रीशी कधीच विवाह करू नये, कारण अशी स्त्री त्या पुरुषाला कधीच मनाने प्रेम करणार नाही.
आणि एक ना एक दिवस त्याला सोडून नक्की जाईल. जी स्त्री कडू बोलते, ज्या स्त्रीची वाणी कर्कश आहे अशा स्त्रीशी सुद्धा लग्न करू नये. जी स्त्री खोटं बोलते किंवा तिला खोट बोलायची सवयच असते अशा स्त्री सोबत चुकून सुद्धा विवाह करू नये.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.