नमस्कार मित्रांनो
रत्न
रत्न हे अनेक प्रकारचे असतात जसे की मोती, माणिक, मुंगा, हिरा, पुष्कराज. यांची किंमत ही खुप असते, यातील काही रत्न ग्रहदोष कमी करून चांगले परिणाम देतात. हिरा सुद्धा एक अमुल्य रत्न आहे पण हे कोळशाच्या खाणीत मिळते त्याचप्रमाणे मोती आणि मुंगा हे समुद्रातून मिळतात.
तस बघितलं तर कोळशाच्या खाणीत प्राप्त होणारे रत्न खुप किंमती असतात आणि आपण ते धारण ही करतो. म्हणून अस म्हणलं जात की रत्न कुठूनही मिळो ते घेण्यास कधीच संकोच करू नका.
विद्या
विद्या म्हणजे ज्ञान कुठूनही मिळत असेल, कोणत्याही व्यक्तीकडून मिळत असेल मग ते चांगले असो किंवा वाईट, छोटे असो किंवा मोठे घेण्यास कधीही संकोच करु नका. ज्ञानामुळे आपण आपल्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो. आपल्याला योग्य ज्ञान असेल तर कोणतीही गोष्ट मिळवण्यास अवघड नाही.
पण त्यासाठी गरजेचे आहे की ते ज्ञान आपल्या अंतर्मनात उतरवले पाहिजे. ज्ञान फक्त ऐकायचे नाही तर ते आपले आचार, विचार, चरित्र, व्यवहार आणि जीवनात उतरवल्यास आपण आपले लक्ष्य सहजतेने प्राप्त करू शकतो. या गोष्टी जाणूनच आपली मानसिकता मोठी होते म्हणून विद्या कोठूनही मिळो ती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
धर्म
धर्म हा एक संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ असा की धारण करणे. धर्माचा अर्थ खूप विशाल आहे, याला काही शब्दात स्पष्ट करणे अवघड आहे. धर्म आपल्याला काम जबाबदारीने करायला शिकवतो.
दुसऱ्याची मदत करणे, आपले चरित्र स्वच्छ ठेवणे, आपल्या परिवाराचे पालन पोषण करणे आणि नेहमी खरे बोलणे हे पण धर्माचे स्वरूप आहे जिथे आपल्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यासारखे सिद्धांत मिळतात. आणि ते ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पवित्र
पवित्र याचा संबंध केवळ शरीराशी येत नसतो तर आचार, विचार यांच्याशी संबंधित पण आहे. जोपर्यंत आपला व्यवहार आणि विचार पवित्र होत नाहीत तोपर्यंत जीवनात उन्नती नाही म्हणून जर तुम्हाला कोणतेही कठीण लक्ष प्राप्त करायचे असेल तर आपण आपले विचार शुद्ध ठेवायला पाहिजेत.
त्याचसोबत चरित्र ही स्वच्छ ठेवले पाहिजे. जेव्हा आपले व्यवहार आणि मानसिकता पवित्र होईल तेव्हाच आपण आपले काम जबाबदारी ने करू शकतो व आपले लक्ष्य प्राप्त करू शकतो.
उपदेश
जर तुम्ही कुठे तरी जात असाल आणि संत किंवा महात्मा उपदेश देत असतील तर थोडा वेळ तिथे थांबण्यास संकोच करू नका. कोणत्याही संतांचा उपदेश तुम्हाला मार्ग दाखवू शकतो.
संतांच्या उपदेशातच लक्ष प्राप्ती, परिवाराची संतुष्टी, आपल्या जबाबदारीचे अहं सूत्र तुम्हाला मिळू शकतात. जेव्हा तुम्ही संत महातम्यांचे उपदेश ऐकाल तेव्हा तुमच्या समस्या आपोआप दूर होतील. म्हणून कोणाकडूनही उपदेश मिळत असेल तर विना संकोच घ्या.
सुंदरता
सुंदरता म्हणजे फक्त चेहरा सुंदर असणे अस नाही तर चरित्र ही सुंदर असले पाहिजे. ज्या स्त्रीचा चेहरा, शरीर, चरित्र साफ, स्वच्छ आहे ती स्त्री आपल्या कुळासोबतच आपल्या नवऱ्याच्या कुळाचाही मान वाढवते. चरित्रवान स्त्री भेटल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात, अशी स्त्री आपल्या परिवाराला कोणत्याही संकटातून बाहेर काढते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.